Wednesday, April 24, 2019

उन्हाळा सुसह्य होण्यासाठी

1. भरपूर द्रव आहार घ्यावा म्हणजे खीर, पन्हं,सरबत, ताक,नारळपाणी इ.
2. पाणी भरपूर असणारी फळं किंवा भाज्या आहारात अवश्य समाविष्ट करा उदा. कलिंगड, खरबूज, द्राक्षं, काकडी, टोमॅटो, कांदा इ.
3. दर दीड दोन तासांनी थोडं थोडं पाणी प्या.
4. पाण्याचा थंडावा वाढावा म्हणून त्यात वाळा, मोगऱ्याची फुलं टाका.
5. हात पाय, डोळे यांची आग होत असेल तर थोडे धणे, जिरे भरडून ते थोडा वेळ पाण्यात भिजवून मग ते पाणी गाळून त्यात खडीसाखर टाकून प्या.
6. नाकातून उष्ण वाफा येणं, रक्त येणं अशा तक्रारी असतील तर सकाळी एक चमचा गुलकंद खा.
7. तूप गुणाने थंड आहे, तसंच दूध, लोणी हे पदार्थ ही, तेव्हा त्यांचा आहारात वापर करा.
8. दही स्पर्शाला थंड वाटलं तरी गुणाने उष्ण आहे, त्यामुळे उन्हाळ्यात दही नको, भरपूर पाणी घालून, मीठ, जिरेपूड घातलेलं ताक चालेल.
9. पेप्सी, कोक वगैरे आर्टिफिशियल कोल्ड्रिंक्स पेक्षा लिंबू सरबत, कोकम सरबत ,कैरी पन्हं नक्कीच अधिक पथ्यकर आहेत.
10. फ्रीजपेक्षा माठातील गार पाणी अधिक थंडावा आणि समाधान देतं, तहान भागवतं.
11. अगदी कोमट किंवा गार पाण्याने अंघोळ करायला हरकत नाही.
12. गार पाण्यात पोहणं हा उत्तम व्यायाम आणि त्याच वेळी गरमी, घाम घालवण्यासाठी छान, सुखद उपाय खालील प्रकारे -


1. घाम शोषून घेतील असे मऊ,सुती आणि फिक्या रंगाचे कपडे वापरावे.
2. फिटिंगचे,टाईट बसतील असे कपडे टाळावे,विशेषतः जाडजूड
3. जीन्स घालणं नक्कीच टाळावं कारण त्यामुळे मांड्यांजवळ खूप घाम येतो, पुरळ,घामोळी येऊ शकतात.
4. ज्यांना खूप घाम येतो त्यांनी दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी साबण वापरण्यापेक्षा डाळीचे पीठ, हळद, चंदन पावडर टाकून वापरावी उन्हाळ्यात होणाऱ्या इतर त्रासांसाठी आणि त्यावरील वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधा.



- वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)

आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर
स्वामी समर्थ केंद्राशेजारी ,रथचक्र सोसायटी मागे
इंदिरानगर ,नाशिक

0253 2322100

No comments:

Post a Comment